25 वर्षांहून अधिक आमदारकीचा अनुभव अन् पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्र सरकारमध्ये नागरी उड्डाण मंत्रिपदही सांभाळले
गोव्याचे नवे राज्यपाल म्हणून राष्ट्रपतींनी पुसापती अशोक गजपती राजू...
पावसाळी अधिवेशनात सरकार आणणारविधेयक; मंत्री माविन गुदिन्होंची माहिती
सरकारी आणि कोमुनिदाद जमिनींवर बांधलेल्या अनधिकृत बांधकामांना नियमित करण्यासाठी येत्या 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या गोवा विधानसभेच्या पावसाळी...
सर्व कंपन्यांना 21 जुलैपर्यंत कार्यवाहीचे आदेश
अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडियााच्या विमान अपघाताबाबत एएआयबीचा प्राथमिक अहवाल समोर आल्यायानंतर आता नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) एक सर्व...
भाजपचे सर्व कार्यकर्ते आणि आमदारांना शिस्त पालन करण्याची सूचना करण्यात आली आहे. पक्षाचा मोठ्या प्रमाणात विस्तार झाल्याने आता पक्षाच्या उमेदवारीसाठी अनेक जण प्रयत्न करीत...
- वरद सु. सबनीस
मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...
देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून ‘अर्थस्य पुरुषो दास’चा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.
- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ)
सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...
भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.
सांकवाळ रेल्वे स्थानकाजवळील घटना
साकवाळ रेल्वे स्थानकाजवळ सोमवारी सकाळी 8 च्या सुमारास रेल्वेच्या धडकेत एका 23 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला. इअरफोन लावून रुळावरून चालत असताना...
राज्यातील अभयारण्यात गोवा सरकार जे ‘इको टुरिझम' प्रकल्प आणू पाहत आहे. त्यामुळे या अभयारण्यातील जीवसृष्टी आणि निसर्गाला धोका निर्माण झालेला असून, हे प्रकल्प रद्द...
फोंडा पोलीस हद्दीत एका 32 वर्षे महिलेचा स्नान करतानाचा व्हिडिओ काढणाऱ्या 17 वर्षी अल्पवयीन मुलाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या...
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची फोंडा येथे माहिती
आयआयटी गोवाने अल्प कालावधीत शिक्षण तसेच संशोधन करत नेत्रदीपक असे काम केलेले आहे. तसेच शालेय विद्यार्थ्यांना द्रोन...
सर्व तालुक्यांत नेमले एसटी प्रमुख
राज्यात 2027 साली होऊ घातलेल्या विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून विविध राजकीय पक्ष आता कामाला लागले आहेत. आम आदमी पक्षाने राज्यातील...
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रेल्वे प्रशासनाकडून महत्त्वाचे पाऊल
भारतीय रेल्वेने देशभरातील सर्व 74,000 रेल्वे कोच आणि 15,000 लोकोमोटिव्ह (इंजिन) मध्ये हाय-टेक सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याची घोषणा केली आहे....
निवडणूक आयोगाची माहिती
बिहारनंतर, निवडणूक आयोग आता देशभरात स्पेशल इंटेंसिव रिवीजन करणार आहे. या अंतर्गत, मतदार यादीची कसून तपासणी आणि अद्ययावतीकरण केले जाते. ते ऑगस्टपासून...
राज्यातील सरकारी प्राथमिक शाळा बंद होण्यास पालकच कारणीभूत असल्याचा आरोप मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केल्यानंतर याला पालक जबाबदार कसे असा सवाल शिक्षक, पालक,...