24 C
Panjim

Covering Goa since 1970

Friday, May 23, 2025

बातम्या

दीड कोटींहून अधिक बक्षीस ठेवलेला सीपीआय-माओवादी सरचिटणीस नंबाला केशवराव याचाही खात्मा; मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त छत्तीसगडच्या नारायणपूर-बिजापूर-दंतेवाडा जिल्ह्यातील सीमावर्ती भागात काल सकाळी झालेल्या चकमकीत सुरक्षा...

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात मुसळधार कायम

काल सलग दुसऱ्या दिवशी मान्सूनपूर्व पावसाने गोव्याला झोडपून काढल्याने राज्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. जोरदार पावसामुळे काही ठिकाणी झाडांची पडझड झाल्याने मालमत्तेचे नुकसान व...

ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटरची लवकरच नियुक्ती होणार

मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित; आक्षेप मागवले राज्य सरकारकडून ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटरची नियुक्ती केली जाणार आहे. त्यासाठी वाहतूक खात्याने गोवा ट्रान्सपोर्ट ॲग्रीगेटर मार्गदर्शक तत्त्वे अधिसूचित काल केली.मोटार वाहन...

देशाच्या प्रगतीसाठी सीमेवर शांतता गरजेची : उपराष्ट्रपती

मुरगाव बंदरात विविध प्रकल्पांचे उद्घाटन गोव्याचे सौंदर्य जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांना खुणावत आहे. त्यामुळे गोव्याचे पर्यावरण जपण्यासाठी सौर ऊर्जेसह इको फ्रेंडली प्रकल्प उभारणे गरजेचे आहे. या...

TOP STORIES TODAY

spot_img
spot_img

MOST READ

नाण्यांचा प्रवास…

- वरद सु. सबनीस मानवी समाजाच्या उत्क्रांतीमध्ये चाकाचा शोध, शेतीची सुरुवात, राज्य-व्यवस्थेचा उदय हे महत्त्वाचे टप्पे समजले जातात. अशा क्रांतिकारी घटनाक्रमांतून आजच्या आधुनिक युगाच्या...

भ्रष्टाचाराचा भस्मासुर

- शरत्चंद्र देशप्रभू

देशात आज भ्रष्टाचाराचा वारू चौफेर उधळला आहे. या भ्रष्टाचाराने सारी शासनयंत्रणा पोखरून खिळखिळी केल्याचे दाहक वास्तव संस्कारक्षम समाजमनाला अस्वस्थ करीत आहे. पूर्वी भ्रष्टाचार लपूनछपून चालायचा; आज तो उघडपणे, बेमुर्वतपणे पुढे चालला आहे. समाज भ्रष्टाचाराला रोखण्याबाबत हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. बुद्धिजीवी लोक कौरवसभेतल्या भीष्म-द्रोणासारखे खाली मान घालून अर्थस्य पुरुषो दासचा जप करताहेत, हांजी हांजी करून स्वतःसाठी पदे, सवलती उकळण्यात मश्गूल आहेत. विचारवंतांची दातखीळ बसली आहे अन् लेखणी संपावर गेली आहे. खातेप्रमुखांची अवस्था तर प्रतिष्ठित चपराशासारखी झाली आहे. राजकारण्यांना पैसे उकळण्यासाठी नवनवी कुरणे निर्माण करणे, हेच त्यांचे इतिकर्तव्य होऊन बसले आहे.

पक्षाघात आणि आयुर्वेद उपचार

- कांता जाधव भिंगारे (आयुर्वेद तज्ज्ञ) सर्वसामान्य भाषेत अंगावरून वारे जाणे म्हणजे पक्षाघात होय. याला बरीच पर्यायी नावे आहेत, जसे पक्षवध, पक्षाघात, एकांगवात, एकांगरोग, अर्धांगवात...

लोकपाल की भ्रष्टाचार निर्मूलन आयोग?

- ऍड. अमृत कांसार 

भारत एक सार्वभौम, लोकशाही, गणराज्य राष्ट्र आहे. भारताचे सार्वभौमत्व भारतीय जनतेचे सार्वभौमत्व आहे आणि भारतीय जनता हे सार्वभौमत्व जनतेने निवडून दिलेल्या संसदेतील त्यांच्या प्रतिनिधीद्वारे संसदेच्या श्रेष्ठत्वाद्वारे प्रकट करते. संविधान अनुच्छेद ७९ प्रमाणे संघराज्याकरिता एक संसद आहे. राष्ट्रपती व ‘राज्यसभा’ आणि ‘लोकसभा’ अशी दोन सभागृहे मिळून संसद बनलेली आहे. शासनांगात अनुच्छेद ७४ (१) प्रमाणे राष्ट्रपतीस साहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी प्रधानमंत्री प्रमुखपदी असलेली एक मंत्रिपरिषद आहे व राष्ट्रपती आपल्या कार्याधिकारांचा वापर करताना अशा सल्ल्यानुसार वागतात. अनुच्छेद ७५ (३) प्रमाणे मंत्रिपरिषद लोकसभेस सामुदायिकपणे जबाबदार आहे.

OTHER STORIES IN THIS SECTION

प्रसाद लोलयेकरांनाही कारवाईचा इशारा

केंद्रीय गृहमंत्रालयाने आयएएस अधिकारी संजीत रॉड्रीगीस यांच्यानंतर आणखी एक आयएएस अधिकारी प्रसाद लोलयेकर यांना बदलीच्या ठिकाणी त्वरित रुजू होण्याचा आदेश दिला असून, ह्या आदेशाचे...

राज्यात तीन वेगवेगळ्या अपघातांत तिघे ठार

राज्यात गेल्या 24 तासांत तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातांत तिघांचा मृत्यू झाला. बस्तोडा-म्हापसा येथील स्वयंअपघातात जखमी 21 वर्षीय तरुणाचे उपचारादरम्यान निधन झाले. कांसावली-कुठ्ठाळीतील अपघातात...

हेरगिरीप्रकरणी यूट्यूबर तरुणी एनआयएच्या ताब्यात

पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या यूट्यूबर ज्योती मल्होत्राला राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) ताब्यात घेतले आहे. ज्योतीची चौकशी करण्यासाठी एनआयएचे पथक सोमवारी हिसारला...

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून गोवा दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे मंगळवार दि. 20 ते गुरुवार दि. 22 मे या तीन दिवसांसाठी गोवा दौऱ्यावर असतील. या दौऱ्यात 21 मे रोजी उपराष्ट्रपती...

राज्यात आज पावसाची शक्यता

आज मंगळवार दि. 20 मेपासून शनिवार दि. 24 मेपर्यंत राज्यातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वरील काळात...

कमलाकांत तारी यांना मयेरत्न पुरस्कार जाहीर

गोसेवक व सामाजिक कार्यकर्ते कमलाकांत तारी यांना मयेरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. मये येथे 24 व 25 रोजी होणाऱ्या मये महोत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद...

सुरक्षित प्रवासासाठी माझी बस योजना

>> कदंबच्या व्यवस्थापकीय संचालकांची माहिती माझी बस योजना - 2025 गोव्यातील प्रवाशांच्या सुरळीत आणि सुरक्षित प्रवासासाठी तयार करण्यात आली असून या बस योजनेमध्ये सहभागी होणाऱ्या...

राज्य सरकारने राज्यातील 50 टक्के घरांच्या छतावरून सौरऊर्जा निर्मितीचे लक्ष्य : मुख्यमंत्री

राज्य सरकारने राज्यातील 50 टक्के घरांच्या छतावरून सौरऊर्जा निर्मिती आणि 63 आदर्श सौर गावांचे लक्ष्य ठेवले आहे. पीएम-कुसुम अंतर्गत शेतकऱ्यांसाठी मोफत सौर पंप उपलब्ध...

STAY CONNECTED

847FansLike
20FollowersFollow
8,000SubscribersSubscribe

FROM THE MAGAZINES