सभागृहांचे कामकाज अडथळ्यांविना व्हावे

0
86

सुमित्रा महाजनांचे प्रतिपादन
लोकसभा, राज्यसभा तसेच राज्य विधानसभांचे कामकाज हे विना अडथळा पार पडायला हवे. तसेच या सभागृहांमध्ये जास्तीत जास्त दिवस काम चालायला हवे, असे लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी काल पत्रकार परिषदेत सांगितले.भारत क्षेत्र राष्ट्रकुल संसदीय संघाच्या पाचव्या दोन दिवसीय परिषदेचा समारोप झाल्यानंतर काल पत्रकारांशी बोलताना त्यानी वरील मत व्यक्त केले.
विनाकारण सभागृहात गोंधळ लोकशाहीस मारक
सभागृहांचे कामकाज पुन्हा पुन्हा अडवून धरण्याचे किंवा त्यात अडथळे आणण्याचे जे प्रकार देशात घडत असतात त्यामुळे या सभागृहांची प्रतिमा मलीन होत असते. तसेच कामकाजावर त्याचा विपरीत परिणाम होत असतो. क्वचित प्रसंगी एखाद्या सकारात्मक कारणासाठी सभागृहाचे कामकाज अडवून धरले जाते ते आपण समजू शकतो. पण पुन्हा पुन्हा विनाकारण सभागृहात गोंधळ घालणे हे लोकशाहीच्या हिताचे नसल्याचे महाजन यांनी यावेळी स्पष्ट केले.