भारतीय लष्कराकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा

0
70

भारतीय सैनिकांनी काल उरी विभागात पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हल्ल्याचा प्रयत्न विङ्गल केला. यावेळी भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या दोन ‘बॅट’ कमांडोंना ठार केले.
नियंत्रण रेषेनजीक गस्तीवर असलेल्या भारतीय सैनिकांवर हल्ला करण्याचा पाकिस्तानच्या बॉर्डर ऍक्शन टिमचा (बॅट) डावपेच होता. मात्र हा डाव योग्य वेळेत ओळखून भारतीय जवानांना पाक सैनिकांना जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यात त्यांचे दोन कमांडो ठार झाले.
या आधी चालू महिन्याच्या प्रारंभी गस्तीवरील भारतीय जवानांवर असाच हल्ला झाला होता व त्यात दोन जवान शहीद झाले होते. पाकच्या ‘बॅट’ या तुकडीत सैनिकांबरोबरच दहशतवादी असल्याचेही वृत्त आहे.
लष्कराच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काल सकाळी ८.४० वा. उरीतील झेलम विभागात बॅट कमांडोंच्या हालचाली गस्तीवरील जवानांनी टिपल्या. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबाराच्या चकमकी सुरू झाल्या. पाकिस्तानी चौकीवरून दोघेजण भारतीय हद्दीत घुसले होते. मात्र भारतीय जवानांनी त्यांनी टिपले.त्यांच्याकडील एके ४७ रायङ्गली, पिस्तुले व दारूगोळा ताब्यात घेण्यात आला.