पंचायत निवडणुका १७ जून रोजी

0
56

>> सांजावमुळे तारखेत बदल

येत्या दि. २५ जून हा सांजाव सणाचा दिवस असल्याने राज्यातील पंचायतींच्या निवडणुका दि. २५ जून ऐवजी दि. १७ जून रोजी घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य निवडणूक आयोगाला सरकारने तशी सूचना केली आहे.
पंचायतमंत्री माविन गुदिन्हो यांच्यासह अन्य काही मंत्र्यांनी वरील निवडणुका दि. २५ जून रोजी न घेण्याची विनंती केली होती. त्यामुळेच निवडणुकीच्या तारखेत बदल केल्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी सांगितले. जूनमध्ये पाऊस सुरू होतो. त्याचा निवडणुकीच्या टक्केवारीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. वरील निवडणुका मे मध्ये घेण्याची राज्य निवडणूक आयोगाची तयारी होती. परंतु मे महिन्यात निवडणुकीसाठी लागणारा कर्मचारी वर्ग रजेवर जात असल्याने निवडणूक कामावर परिणाम होण्याची शक्यता होती. त्यामुळे सरकारने निवडणुका जूनमध्ये घेणे पसंत केले, असे सांगण्यात येते.