ओडिशात वीज पडून २९ मृत्यूमुखी : ८ जखमी

0
69

ओडिशातील विविध भागांत काल वीज पडून झालेल्या दुर्घटनांत किमान २९ जण मरण पावले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. सर्वाधिक ८ जण भद्रक जिल्ह्यात मृत्यूमुखी पडले. आठजण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात आले.

या दुर्घटनेत बालासोरमध्ये ७, खुर्दमध्ये ५, मयुरभंजामध्ये ३ तर केंद्रपाडा, केओंझार व नयागड येथे प्रत्येकी एक मृत्यूमुखी पडल्याचे सांगण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी या दुर्घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले असून मृतांच्या नातेवाईकांना सहाय्य करण्यासाठी तातडीने खास आयुक्त नेमण्याचे निर्देश दिले आहेत. शेतांमध्ये काम करत असताना या लोकांवर वीजेचे लोळ पडल्याचे सांगण्यात आले.

मयूरभंजमधील दुर्घटनेत एक दहावीची विद्यार्थीनी मरण पावली. तर नयागढमध्ये सायकलवरून जाणारा इसम वीजेचा बळी ठरला.