राज्यातील १०८ रुग्णवाहिका कर्मचार्यांनी कालपासून कांपाल येथील आरोग्य संचालनालयासमोर धरणे आंदोलन सुरू केले आहे. कंपनीकडून सतावणूक होत असल्याचे कारण पुढे करून सर्व कर्मचार्यांनी संप पुकारला असल्याने ‘१०८’ रुग्णसेवा ठप्प झाली आहे. सरकार कर्मचार्यांच्या मागण्याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा कर्मचार्यांचा आरोप आहे. १० ते १५ रुपये अशी नगण्य पगारवाढ कर्मचार्यांना देण्यात आली असून ती योग्य नसल्याचे कर्मचार्यांचे म्हणणे आहे.