हरयाणा सरकारचा १ सप्टेंबरपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय

0
41

हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांनी, येत्या १ सप्टेंबरपासून राज्यातील चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या संदर्भात सरकारच्या अधिकृत ट्विटवरून माहिती देण्यात आली आहे. यापूर्वी हरयाणामध्ये कोरोना नियम पाळून महाविद्यालये सुरू करण्यात आली आहेत. १ सप्टेंबरपासून सुरू करण्यात येणार्‍या शाळांतील चौथी व पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाने जारी केलेल्या एसओपींचे पालन करून तुकड्या करण्यात येणार आहेत. तसेच आई-वडिलांच्या परवानगीनंतरच विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिला जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे.