भारत-चीन सैन्य मागे घेणे सुरू ः राजनाथ

0
87

संसद अधिवेशनादरम्यान काल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी, राज्यसभेत भारत – चीन तणावासंबंधी माहिती देताना पँगॉंग सरोवराच्या उत्तर आणि दक्षिणेस सैन्य मागे घेण्याचे दोन्ही देशांकडून मान्य करण्यात आले आहे. त्यानुसार बुधवारपासून सीमेवर सैन्य मागे घेण्याची प्रक्रिया सुरू झाली असल्याचे सांगितले. भारत आणि चीन या दोन्ही पक्षांत वेगवेगळ्या स्तरांवर चर्चा सुरू असून नियंत्रण रेषेवर शांततापूर्ण स्थिती कायम राखण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत, असेही यावेळी संरक्षणमंत्र्यांनी स्पष्ट केले.