बुडालेल्या ‘त्या’ बार्जमधील आणखी ४ मृतदेह सापडले

0
133

तौक्ते चक्रीवादळामुळे ’मुंबई हाय’ जवळील दुर्घटनेत आज रविवारी एकूण ४ मृतदेह हाती आले असून आतापर्यंत एकूण ७० मृतदेह हाती आल्याचे स्पष्ट झाले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत १८६ जणांचे प्राण वाचविण्यात नौदलासह अन्य बचाव नौकांना यश आले आहे. शोधमोहिमेत आतापर्यंत २५६ कर्मचार्‍यांचा पत्ता लागला आहे. तौक्ते चक्रीवादळामुळे ‘ओएनजीसी’च्या हीरा इंधन विहीर परिसरात कार्यरत असलेली ‘पी-३०५’ ही बार्ज (तराफा) समुद्रात बुडाली. या अपघातात आत्तापर्यंत एकूण ७० जणांचा मृत्यू झाला आहे. तर, अजूनही काहीजण बेपत्ता असून त्यांचा शोध मोहिमेअंतर्गत शोध घेणे सुरू आहे.