त्या तीन प्रकल्पांनी गोवा नष्ट होईल ः चोडणकर

0
85

तमनार वीज प्रकल्प, रेल्वे दुपदरीकरण आणि राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण ह्या तीन प्रकल्पांना हिरवा कंदील दाखवला तर राज्यातील पर्यावरण, वन आणि वन्यजीवांचे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी ५०० वर्षे लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मर्जीतील उद्योगपतींना मदत करण्यासाठीच व स्वत:च्या फायद्यासाठी पुढील ५० वर्षांत माया जमविण्याच्या ध्येयानेच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि भाजप हे प्रकल्प पुढे नेण्यास विविध युक्त्या वापरत असल्याचा आरोप कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी केला.
तीन प्रकल्प पुढील ५० वर्षांचे नियोजन करून आणण्यात आल्याचे विधान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रविवारी दक्षिण गोव्यात झालेल्या एका कार्यक्रमात केले. त्यावर प्रतिक्रिया देताना गिरीश चोडणकर यांनी भाजपाचे हे कटकारस्थान असल्याचा दावा केला.