आम आदमी पार्टी २०१७ साली राज्यात होणार्या निवडणुका लढवणार असल्याचे आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी काल सांगितले. त्यासाठीची तयारी यापूर्वीच हाती घेण्यात आलेली असून आता लवकर ‘मिशन विस्तार’ हाती घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या मोहिमेद्वारे गोव्यात कार्यकर्त्यांची फळी उभारण्याचे काम हाती घेण्यात येणार असल्याचे श्री. नाईक यांनी स्पष्ट केले. पक्षाला नवी दिल्लीत जे अभूतपूर्व असे यश मिळाले आहे त्या यशाने पक्षाचा आत्मविश्वास वाढला असल्याचे ते म्हणाले. या पार्श्वभूमीवर काल पक्षाने पणजी, रायबंदर व पर्वरी अशी मिरवणुकही काढली.