कायदे रद्द झाल्याशिवाय घरवापसी नाही ः टिकैत

0
200

केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर गेल्या अडीच महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करत आहेत. केंद्र सरकार आणि शेतकरी नेते यांच्यात चर्चेच्या अकरा फेर्‍या झाल्या मात्र त्यावर तोडगा निघू शकला नाही. दरम्यान, काल कायदे रद्द होत नाही तोपर्यंत घर वापसी करणार नसल्याची भूमिका शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी घेतली आहे. तसा इशारा त्यांनी केंद्र सरकारला दिला आहे.