आयटी क्षेत्रातील युवक नोकरीसाठी गोव्या बाहेर जाऊ नयेत म्हणून आयटी गुंतवणूक धोरण तयार करणार असल्याची माहिती मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिली.चिंबल येथे चार लाख चौ. मीटर जागेत आयटी हब उभारणार असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले. राज्यातील युवक नोकर्यांसाठी बाहेर जात आहेत. या प्रकारामुळे सामाजिक समस्याही निर्माण होेते. आपण या विषयाबाबतीत गंभीर असल्याचे पार्सेकर यांनी सांगितले.
पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी आणलेल्या यासंबंधीच्या ठारावावर मुख्यमंत्री उत्तर देत होते. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरानंतर खंवटे यांनी आपला ठराव मागे घेतला.