एकाधिकारशाहीमुळे पक्ष संपेल

0
119

केजरीवालांवर आरोप
आम आदमी पक्षाचे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांच्यावर काल या पक्षाचे संस्थापक सदस्य असलेल्या प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीका केली. पक्षात आपलाच शब्द अंतिम मानला जावा अशी केजरीवाल यांची इच्छा असते. त्यांच्या अशा एकाधिकार शाहीमुळे हा पक्ष संपेल असा इशारा यावेळी भूषण व यादव यांनी दिला.पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचा राजिनामा देण्याची आपल्याकडे सातत्याने मागणी केली जात होती. मात्र आपण तो राजिनामा दिलेला नाही, असे उभयतांनी स्पष्ट केले.
आम आदमी पक्षाची निर्मिती ही आंदोलनाच्या माध्यमातून झालेली आहे. या पक्षाचा संघर्ष हा स्वराज्यासाठी आहे. तथापि अलीकडे या पक्षात अनेक गोष्टी बिघडल्या आहेत, असे यादव म्हणाले.
आपची स्थिती अन्य राजकीय पक्षांप्रमाणे होऊ एवढीच आपली इच्छा आहे. त्या दृष्टिकोनातून पक्ष कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले गेले पाहिजे याकडे त्यांनी लक्ष वेधले.