१०० कोटींपेक्षा कमी खर्चाचे टोलनाके बंद करणार

0
117

केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांची घोषणा
देशातील १०० कोटींपेक्षा कमी खर्च असलेले टोलनाके बंद करणार असल्याची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी काल राज्यसभेत केली. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील ६२ टोलनाके बंद होणार आहेत.मंत्री गडकरी माहिती देताना म्हणाले की केंद्र सरकारने आतापर्यंत महाराष्ट्रासह देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील ६५ टोलनाके बंद रद्द केले आहेत. वरील निर्णयामुळे महाराष्ट्रातील १२ टोलनाके बंद होणार असल्याचे ते म्हणाले.
देशभरात ३९० पैकी १८० टोलनाक्यांवर ई-टोलची सुविधा सुरू करण्यात आली असल्याचीही माहिती रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी दिली.
दरम्यान, महाराष्ट्रात अन्यायकारक टोलवसुलीमुळे लोकांमध्ये प्रचंड असंतोष असून केंद्र सरकारच्या टोलविरुद्ध घेतलेल्या या निर्णयामुळे लोकांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.