सरकार चालविण्यात पर्रीकर अपयशी ठरतील ः शांताराम

0
104

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेसला जनादेश मिळाला असताना मनोहर पर्रीकर यांनी सरकार स्थापन केले असले तरी ते चालविण्यात ते अपयशी ठरतील अशी प्रतिक्रिया नवनियुक्त प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष शांताराम नाईक यांनी काल येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली. पर्रीकर सरकार स्वकर्मानेच कोसळेल अशी टिप्पणी नाईक यांनी केली. आपण पक्षासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे ते म्हणाले.
कॉंग्रेस पक्षासाठी आपले योगदान व गोव्यातील लोकांच्या मागणीनुसार प्रदेशाध्यक्षपदी आपली नेमणूक केल्याबद्दल मावळते राज्यसभा खासदार शांताराम नाईक यांनी सोनिया गांधी व उपाध्यक्ष राहूल गांधीचे आभार मानले.
नाईक यांनी सांगितले की, आव्हानात्मक परिस्थितीत आपली अध्यक्षपदी निवड केली आहे. राज्यसभेची आपली मुदत २८ जुलै रोजी संपत आहे. आपण आज शनिवारी दि. ८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता अध्यक्षपदाचा ताबा घेणार आहे, असे त्यांनी सांगितले.