सरकारी कर्मचार्‍यांसाठी ५० टक्के उपस्थिती १५ जूनपर्यंत कायम

0
106

कोरोना महामारीच्या पार्श्‍वभूमीवर सर्व सरकारी कर्मचारी एकाचवेळी कार्यालयात आले तर कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे राज्य सरकारने सोमवारी कामावर आलेल्या कर्मचार्‍यांनी मंगळवारी कामावर येऊ नये. तसेच मंगळवारी कामावर आलेल्यांनी बुधवारी न येता गुरूवारी कामावर यावे अशी सरकारी कर्मचार्‍यांसाठी मार्गदर्शक तत्वे तयार केली आहेत. ती येत्या १५ जूनपर्यंत कायम लागू राहणार असल्याचे काल सरकारने एका आदेशाद्वारे स्पष्ट केले.

अवर सचिव श्रीपाद आर्लेकर यांनी काल काढलेल्या आदेशात, गेल्या २१ एप्रिल रोजी जो आदेश काढण्यात आलेला आहे तो येत्या २१ जूनपर्यंत कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे.