रुग्णांच्या मृत्यूस आरोग्यमंत्री जबाबदार ः बाबूश

0
120

>> रुग्णांच्या मृत्यूस आरोग्यमंत्री जबाबदार ः बाबूश

राज्यातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूच्या वाढत्या प्रमाणाला आरोग्यमंत्री विश्वजीत राणे आणि आरोग्य विभाग जबाबदार आहे, असा आरोप काल पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांनी केला. गोमेकॉतील वाढत्या रूग्णांच्या मृत्यूची सीबीआय चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडे करणार आहे, असेही आमदार मोन्सेरात यांनी म्हटले आहे. आरोग्यमंत्री राणे कोरोना नियंत्रणासाठी पूर्णपणे अपयशी ठरले आहेत. मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी मंत्री राणे यांच्याकडील आरोग्य विभागाचा कारभार काढून घ्यावा अशीही मागणी मोन्सेरात यांनी केली. राज्यातील कोरोना महामारीची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. राज्यातील कुटुंबे आपल्या कुटुंबातील व्यक्ती गमावत आहेत. कोविडच्या दुसर्‍या लाटेचा धोका माहीत असूनही आरोग्य विभाग बेपर्वा राहिला, असा आरोप मोन्सेरात यांनी केला.