राज्यात कायदा सुव्यवस्था  राखण्यात सरकार अपयशी : कॉंग्रेस

0
88

वास्कोत काल दिवसाढवळ्या घडलेल्या दुहेरी खून व चोरी प्रकरणामुळे जनतेच्या मनात भीती निर्माण झाली असून या राज्यात आता ज्येष्ठ नागरिक, महिला, लहानमुले, पर्यटन कोणीही सुरक्षित नाहीत, असे सांगून राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यास पार्सेकर सरकर अपयशी ठरल्याचा आरोप प्रदेश कॉंग्रेसचे प्रवक्ते सुनिल कवठणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केला. राज्यातील गृह खाते निष्क्रीय बनल्याचा आरोप कवठणकर यांनी यावेळी केला. या प्रश्‍नावर सरकारने जनतेला उत्तर देण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या अडीच वर्षांच्या काळात गुन्ह्यांचे प्रमाण वाढल्याचे त्यांनी सांगितले.