राज्यात आजपासून पुन्हा मुसळधार शक्य

0
84

गेल्या आठवड्यात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील विविध भागांत पूर येऊन होत्याचे नव्हते झालेले असतानाच आजपासून दोन दिवस राज्याच्या विविध भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. त्याशिवाय दि. २९ व ३० जुलै रोजी देखील राज्याच्या काही भागांत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सोमवारपासून येत्या दि. ३० जुलैपर्यंत मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही हवामान खात्याने दिला आहे.