राज्यपालांकडून पूरग्रस्तांना मदत देण्याची केंद्राची विनंती

0
151

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोव्यातील पूरग्रस्तांना आर्थिक साहाय्य करण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. या पुरामुळे सुमारे ५ हजार घरांचे नुकसान झाले, तर अनेकांची घरे जमीनदोस्त झाली आहेत. पुरामुळे सुमारे ५०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असेही राज्यपालांनी म्हटले आहे.