राजधानी दिल्लीत ५० हजार शेतकरी प्रवेश करणार

0
88

दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत असलेल्या हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधील सुमारे ५० हजार शेतकरी राजधानी दिल्लीत प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे दिल्ली पोलिसांनी काल गुरुवारी राजधानीच्या सर्व सीमांवर बंदोबस्त वाढवला आहे. शेतकर्‍यांच्या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी हे पाऊल उचलले आहे. शेतकर्‍यांनी मात्र अशी कोणतीही योजना नसल्याचे सांगितले आहे. पोलिसांनी मात्र, शेतकरी संघटनांनी शेतकर्‍यांना पानिपत टोल प्लाझावरून सिंघू सीमेच्या दिशेने येण्यास सांगितले असल्याची माहिती मिळाल्याचे सांगितले. यानंतर सीमावर्ती ठिकाणी पोलीस तैनात केले आहेत.