मोबाईल चोरीप्रकरणी पाचजणांची टोळी अटकेत

0
261

पणजी पोलिसांनी मोबाईल संच चोरी करणार्‍या एका टोळीचा पर्दाफाश केला आहे. या टोळीतील पाच जणांना अटक करून सुमारे ५ लाखांचा ऐवज हस्तगत केला आहे.
या टोळीकडून विविध ब्रॅण्डचे २५ मोबाईल संच, एक एचपी लॅपटॉप जप्त केला असून जप्त करण्यात आलेल्या सामानाची किंमत अंदाजे ५ लाख रुपये एवढी आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक सुदेश नाईक यांनी दिली.

कुमार कृष्णप्पा दोंडरी (२०), राजू रंगप्पा (२२), लक्ष्मणा कृष्णप्पा (२३), श्रीकांत मंजू (२२), रमेश नागराज (२८) अशी अटक केलेल्यांची नावे आहे. संशयित मूळचे शिमोगा – कर्नाटक येथील रहिवासी असून सध्या जुवारीनगर वास्को येथे राहत आहेत. पणजी आणि मडगाव भागातील अनेक चोर्‍यांत ही टोळी गुंतलेली आहे. आरोपींना दोन दिवस पोलीस कोठडी दिली आली आहे.