बारावीचे निकाल ३१ जुलैपर्यंत जाहीर करा ः सर्वोच्च न्यायालय

0
116

सर्वोच्च न्यायालयाने काल सर्व राज्य मंडळांना इयत्ता बारावीच्या परीक्षांचे निकाल येत्या ३१ जुलैपर्यंत जाहीर करण्याचे निर्देश दिले आहेत. यासह सर्वोच्च न्यायालयाने केरळ सरकारला आज दि. २५ रोजी अकरावी परीक्षेसंदर्भात अंतिम निर्णय देण्यास सांगितले आहे. तसेच आंध्र प्रदेश सरकारलाही आज २५ जूनपर्यंत १२ वीच्या परीक्षेच्या धोरणाबद्दल सांगण्याचे निर्देश दिले आहेत.

सर्वोच्च न्यायालयाने सुनावणीदरम्यान राज्य मंडळ परीक्षांबाबत न्यायालयाला एकसारखी योजना लागू करता येणार नाही. सर्व राज्य मंडळांनी स्वतःची योजना तयार करावी, असे निर्देश दिले आहेत.