आम आदमी पक्षाचे राज्यसभेचे खासदार आणि लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटी (एलपीयू) चे कुलपती अशोक मित्तल यांनी ऑपरेशन सिंदूरबाबत चीनवर गंभीर आरोप करताना पाकिस्तानची भूमी भारताविरुद्ध दहशतवादी कारवायांसाठी बऱ्याच काळापासून वापरली जात आहे, परंतु यावेळी भारताने ऑपरेशन सिंदूरद्वारे एक मजबूत आणि धाडसी संदेश दिला आहे. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने आता देश आपल्या सीमा आणि नागरिकांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतो, असे स्पष्ट केले असल्याचे मित्तल म्हणाले.
पाकिस्तानला भडकावण्याची आणि पाठिंबा देण्याची चीनची भूमिका कोणापासूनही लपलेली नाही, असा दावाही यावेळी खासदार मित्तल यांनी केला आहे.
खासदार मित्तल यांनी, चीन पाकिस्तानला धोरणात्मक, आर्थिक आणि तांत्रिक मदत देऊन भारताविरुद्ध सतत कट रचत आहे. भारताला केवळ पाकिस्तानच नाही, तर चीनच्याही हेतूंवर आणि कारवायांवर लक्ष ठेवावे लागेल असे सांगितले.
आम आदमी पक्षाचे खासदार मित्तल यांनी, केंद्र सरकारने घेतलेल्या कठोर निर्णयांचे कौतुक केले आणि आता भारताने आपल्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याचे धाडस दाखवण्याची वेळ आली आहे. पाकिस्तान आणि चीनमधील खोल संबंध भारताच्या अखंडतेसाठी एक मोठा धोका असल्याचे सांगितले. याचे कारण स्पष्ट करताना त्यांनी, दोन्ही देश भारताला अस्थिर करण्यासाठी कोणतेही पाऊल उचलण्यास तयार असल्याचे सांगितले.
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत भारताने अलीकडेच पाकिस्तानच्या सीमेवरील दहशतवादी अड्ड्यांवर मोठी कारवाई केली होती हे उल्लेखनीय आहे. या कारवाईमुळे दोन्ही देशांमधील तणाव वाढला आहे. आता भारतात त्याच्या राजकीय आणि धोरणात्मक पैलूंवरील चर्चा तीव्र झाल्या आहेत.
खासदार मित्तल यांनी, आंतरराष्ट्रीय समुदायाला पाकिस्तान आणि चीनच्या कारवायांवर लक्ष ठेवण्याचे आणि भारताच्या सुरक्षा आणि अखंडतेमध्ये सहकार्य करण्याचे आवाहनही केले.