नारायण राणे यांची आजपासून पुन्हा ‘जन आशीर्वाद’ यात्रा

0
82

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक आणि सुटकेनंतर जन आशीर्वाद यात्रेचा तिसरा भाग सुरू ठेवण्याचा निर्धार भाजपने केला आहे. त्यानुसार आज शुक्रवारपासून पुन्हा ही यात्रा सुरू करण्यात येणार आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात तीन दिवसांची ही यात्रा असेल. यातील दोन दिवस राणेंची जन आशीर्वाद यात्रा सिंधुदुर्गात असणार आहे. या यात्रेमुळे गेल्या तीन दिवसात राज्याचे राजकारण चांगलंच ढवळून निघाले असून सिंधुदुर्गात शिवसेना विरुद्ध राणे संघर्ष तीव्र होण्याची शक्यता आहे.

जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करण्यापूर्वी राणेंनी लिलावती रुग्णालयात जाऊन वैद्यकीय तपासणी करून घेतली. रुटीन चेकअप असल्याची माहिती भाजप नेते प्रसाद लाड यांनी दिली आहे. नारायण राणेंनी १९ ऑगस्टला मुंबईतून जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात केली होती.