जामतारातील रेल्वे अपघातात 12 ठार

0
2

झारखंडमधील जामतारा येथे काल रेल्वे अपघातात 12 जणांचा मृत्यू झाला, तर अनेकजण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना करमाटांडजवळ कालाझरिया येथे घडली. एक्सप्रेस रेल्वेमध्ये किरकोळ आग लागल्यानंतर प्रवाशांना याबाबतची सूचना देण्यात आली. त्यानंतर प्रवाशांमध्ये एकच खळबळ माजली. यावेळी रेल्वेतील अधिकाऱ्यांनी प्रवाशांना घाबरून एक्सप्रेसमधून बाहेर न पडण्याची सूचना केली. मात्र प्रवासी बाहेर उड्या टाकू लागले. याचवेळी समोरुन येणाऱ्या झाझा-आसनसोल रेल्वेने ट्रॅकवर आलेल्या प्रवाशांना चिरडले. त्यात 12 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेकजण जखमी झाले.