जम्मू काश्मीरात ‘लष्कर’च्या सहा दहशतवाद्यांचा खात्मा

0
26

जम्मू काश्मीरमधील राजौरी सेक्टरमधील घनदाट जंगलात भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या ‘लष्कर ए तोयबा’ या दहशतवादी संघटनेच्या सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.

भारतीय लष्कराच्या १६ पोलीस बटालियनकडून याच भागात लपून बसलेल्या तीन ते चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी अजूनही चकमक सुरू आहे. राजौरी सेक्टरमधील चकमकीमध्ये भारतीय लष्कराचे नऊ जवान शहीद झाल्यानंतर चीफ ऑफ डिफेन्स जनरल बिपिन राव यांनी १६ ऑक्टोबर रोजी या प्रदेशाला भेट दिली होती. यावेळी त्यांनी या ठिकाणी नेतृत्व करणार्‍या भारतीय लष्करातील कमांडसोबत सध्या सुरू असणार्‍या कारवाईबद्दल चर्चा केली होती.

यावेळी या कमांडर्सना स्वत: पुढाकार घेऊन दहशतवाद्यांवर हल्ला करण्याऐवजी वाट पाहण्याचा सल्ला देण्यात आला होता. हे दहशतवादी जंगलामधून दोन दोनच्या गटाने हल्ला करत असल्याचे भारतीय लष्कराने सांगितले. मागील दोन ते तीन महिन्यांमध्ये सीमांवर असणार्‍या जंगलामधून ९ ते १० दहशतवाद्यांनी भारतीय सीमांमध्ये घुसखोरी केल्याचे वृत्त असून त्यातील अनेकांचा यापैकी खात्मा करण्यात आला आहे.