जम्मू – काश्मीरमध्ये चकमक, भारतीय सैन्याचा जवान शहीद

0
40

जम्मू – काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील थानामंडी शहरात गुरुवारी दहशतवादी आणि भारतीय सैन्यात झालेल चकमकीत भारतीय सैन्यातील एक जवान शहीद झाला. थानामंडीच्या जंगल परिसरात दहशतवादी असल्याची खात्री झाल्यानंतर सुरक्षा दलांनी जंगलाला घेराव घालून शोधमोहीम सुरू केली होती. दहशतवाद्यांनी जवानांवर गोळीबार केल्यानंतर चकमक सुरू झाली आणि भारतीय जवानांनी त्यांना प्रत्युत्तर दिले. मात्र, दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात भारतीय लष्कराचे कनिष्ठ कमिशन अधिकारी शहीद झाले आहेत.

राष्ट्रीय रायफल्सच्या एका कमिशन अधिकार्‍याला या चकमकीत गोळ्या लागल्या होत्या. त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्य झाला. दरम्यान, या परिसरात अद्यापही चकमक सुरू आहे. यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी थानामंडी भागात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एलईटीचे दोन दहशतवादी ठार झाले होते.