जगभरातील भारतीय समुदायाने एकत्र यावे : मोदी

0
79

अनिवासी भारतीय ही भारताची मोठी ताकद आहे. त्यांच्यापर्यंत पोहचल्यास भारत जागतिक स्तरावर प्रभावशाली ठरू शकतो असे सांगून जगभरातील भारतीय समुदायाने मानवतेच्या कल्याणासाठी सकारात्मक जागतिक शक्ती म्हणून एकत्र यावे असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केले.
गांधीनगरमधील महात्मा मंदिर येथे तेराव्या प्रवासी भारतीय दिवसाचे उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान बोलत होते. ते पुढे म्हणाले की, जगभरात २०० पेक्षा अधिक देशांमध्ये अनिवासी भारतीयांचे वास्तव्य आहे. पूर्वी भारतीय संधीच्या शोधात तसेच ज्ञान मिळवण्यासाठी जगभरात प्रवास करीत होते. आज परिस्थिती बदलली आहे. संधी भारतात येण्यासाठी खुणावत आहे. जग मोठ्या आशेने भारताकडे पाहत आहे. काळ वेगाने बदलत असून भारत मोठ्या सामर्थ्यानिशी पुढे येत असल्याचे ते म्हणाले.