आम आदमी पक्षाचे पणजीत धरणे

0
90

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारच्या नव्या जमीन संपादन, पुनर्वसन व पुनर्वसनी कायदा, २०१३ च्या विरोधात काल आम आदमी पार्टीने येथील आझाद मैदानावर धरणे धरले. पक्षाचे निमंत्रक वाल्मिकी नाईक यांच्या नेतृत्वाखाली हे धरणे धरण्यात आले. या कायद्याखाली जी अधिसूचना काढण्यात आली होती त्या अधिसूचनेच्या प्रतीची यावेळी होळी करण्यात आली. तसेच वाल्मिकी नाईक व दिनेश वाघेला यांच्या नेतृत्वाखालील सहा सदस्यीय शिष्टमंडळाने यावेळी उत्तर गोव्याच्या जिल्हाधिकारी नीला मोहनन् यांना एक निवेदन सादर केले. सदर जमीन संपादन कायदा हा शेतकरी व अन्य जमीन मालकांच्या हिताचा नसल्याचे यावेळी पत्रकारांशी बोलताना दिनेश वाघेला यांनी सांगितले.