अफगाणिस्तानशी असलेली मैत्री महत्त्वाची ः जयशंकर

0
86

अफगाणिस्तानशी असलेली मैत्री भारताला महत्त्वाची आहे असे काल केंद्रीय परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी सांगितले. तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी केंद्र सरकारने काल सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर केंद्रिय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर बोलत होते. त्यांनी, यांनी अफगाणिस्तानप्रकरणी सरकारसह सर्व राजकीय पक्षांचा समान दृष्टिकोन आहे.

त्याचप्रमाणे, अफगाण लोकांशी असलेली मैत्रीदेखील आपल्यासाठी महत्त्वाची असल्याचे सांगितले. आम्ही ऑपरेशन ‘देवी शक्ती’ अंतर्गत ६ उड्डाणे केली आहेत. आम्ही बहुतेक भारतीयांना परत आणले आहे. पण सर्वांना नाही. कारण त्यांच्यापैकी काही जण उड्डाणाच्या वेळी येऊ शकले नाहीत. यावेळी काही अफगाण नागरिकांनाही बाहेर काढल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

सर्व राजकीय पक्षांच्या नेत्यांना अफगाणिस्तानच्या परिस्थितीबाबत माहिती दिली आहे. आम्ही तेथे अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याचे जयशंकर यांनी यावेळी सांगितले.