येत्या मंगळवारी पाकिस्तानात होणार्या ‘सार्क’ देशांच्या परिषदेत सहभागी न होण्याचा निर्णय भारताने जाहीर केला आहे. दहशतवादाच्या ताज्या घटनांच्या विषयावरून राजनैतिक दबावतंत्राचा एक भाग म्हणून हा निर्णय झाला आहे.
सार्क परिषदेसाठी विद्यमान स्थिती अनुकूल नसल्याचे कारणही भारताने पुढे केले आहे. दरम्यान भारताबरोबरच अफगाणिस्तान, बांगला देश व भूतान या देशांनीही या परिषदेवर बहिष्कार टाकला आहे. यामुळे पाकिस्तानमधील ही परिषद रद्द ठरण्याची शक्यता आहे.
उरी येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला एकटे पाडण्याचे आवाहन केले होते.