सर्जिकल स्ट्राईक शंभर टक्के अचूक : पर्रीकर

0
62

पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून भारतीय सैन्याने शंभर टक्के अचूक सर्जिकल स्ट्राईक केला. कोणत्याही देशाला भारतासारखा असा हल्ला करता आलेला नाही. सर्जिकल स्ट्राईकवेळी भारताचा एकही जवान शहीद झाला नसल्याचे सांगून भारतीय लष्कर कोणतीही मोहिम फत्ते करू शकते हे यावरून सिद्ध झाले असल्याचे संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी काल आग्रा येथील एका कार्यक्रमात बोलताना सांगितले.

सर्जिकल स्ट्राईकचे पुरावे मागणार्‍या विरोधकांवर पर्रीकर यांनी जोरदार टीका केली. लष्कराच्या शौर्याचा आतापर्यंत कोणीही पुरावा मागितला नव्हता. मात्र, गेल्या काही दिवसांपासून पहिल्यांदाच काही लोकांकडून सैन्याच्या कार्यक्षमतेवर संशय घेतला जात आहे. प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी जासूस होत पाकिस्तानी लष्करी अधिकार्‍यांशी चर्चा करून व तेथील लोकांची मते जाणून घेत हल्ला करण्यात आल्याची कबुली मिळवली आहे. त्यामुळे आणखी काही पुरावे जनतेला मिळण्याची गरज राहिलेली नाही असे सांगून आम्ही त्यांना कोणतेही पुरावे देणार नसल्याचे पर्रीकरांनी यावेळी सांगितले. पाकिस्तानचा कोणताही हल्ला परतवून लावला जाईल असे संरक्षणमंत्र्यांनी ठणकावले.