संचारबंदीत वाढ करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत

0
101

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीत आणखी वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिले. येत्या २८ जून रोजी ही संचारबंदी संपत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर काल पत्रकारांना त्याविषयीची माहिती देताना त्यांनी संचारबंदीत वाढ होऊ शकते असे स्पष्ट केले. राज्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने कहर केल्याच्या पार्श्‍वभूमीवर ९ मे पासून राज्यात मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केली आहे. दरम्यान, मागच्या वेळी लागू करण्यात आलेल्या संचारबंदीचा काळ २८ जून रोजी संपत असून त्या पार्श्‍वभूमीवर काल बोलताना मुख्यमंत्र्यानी संचारबंदीत आणखी वाढ करण्यात येणार असल्याची माहिती दिली.