पाच मामलेदारांच्या बदल्या

0
94

सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे ५ मामलेदारांच्या वेगवेगळ्या ठिकाणी बदल्या केल्या आहेत. सत्तरीच्या मामलेदार शमा नार्वेकर यांची बदली बार्देश तालुक्यात केली आहे. बार्देशचे मामलेदार दशरथ गांवस यांना सत्तरीला पाठविले आहे. वाळपई पालिकेच्या मुख्य अधिकारी पदाचा ताबाही त्यांच्याकडे दिला आहे. सासष्टीचे संयुक्त मामलेदार मंदार एम नाईक यांची बदली बार्देशचे संयुक्त मामलेदार म्हणून केली आहे. बार्देशचे संयुक्त मामलेदार रॉशेल फर्नांडिस यांना फोंड्याला पाठविले आहे. पेडणेच्या संयुक्त मामलेदार इशा सावंत यांची बदली बार्देशच्या संयुक्त मामलेदारपदी केली आहे.