नोट बंदीतून भारत विजयी होईल : पंतप्रधान

0
93

आपल्या सरकारने ५०० व १००० रुपयांच्या नोटांवर घातलेली बंदी हे अग्नीदिव्य होते आणि त्यातून अखेरीस भारत देश विजयी होईल असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल येथे आयोजित एका जाहीर सभेत बोलताना केले.

‘नोट बंद’ची मी घोषणा केली त्यावेळी मी म्हटल्याप्रमाणे ही प्रक्रिया वेळ घेणारी अशी आहे. यामुळे अडचणी येतील व काहीशी असुविधाही निर्माण होईल. मात्र त्यानंतर अखेरीस या अग्नी दिव्यात भारत देश विजयी होईल’ असे मोदी भाषणात म्हणाले. नोट बंदीची अंमलबजावणी करताना आपल्या सरकारने लवचिकपणा दाखवला आहे. गरजेनुसार नियमात बदल केले. मी ५० दिवसांची मुदत मागितली आहे आणि केवळ १० दिवसच झाले आहेत व बँका हा पैसा बाजारपेठांत आणील असे त्यांनी सांगितले. नोटबंदी निर्णय आपण कोणाच्या सतावणुकीसाठी घेतलेला नसून भावी पिढ्यांच्या भल्यासाठी घेतला आहे असेही ते म्हणाले.