नवडणुकीची मतमोजणी एकदमच करावी ः सरदेसाई

0
94

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार राज्यात आता पालिका निवडणुका दोन टप्प्यांत होणार आहेत. त्यातील पाच पालिकांची निवडणूक ही दुसर्‍या टप्प्यात होणार आहे. हा दुसरा टप्पा झाल्यानंतर सर्व पालिकांची मतमोजणी एकदम करावी अशी मागणी गोवा फॉरवर्डचे नेते व आमदार विजय सरदेसाई यांनी केली आहे. पहिल्या टप्प्यातील पालिकांची मतमोजणी जर अगोदर केली तर त्याचा परिणाम दुसर्‍या टप्प्यातील मतदानावर होऊ शकतो असे यावेळी सरदेसाई म्हणाले.

निवडणूक आचारसंहिता प्रमाण मानून निवडणूक आयोगाने तसा निर्णय घ्यावा. आपण राज्य निवडणूक आयोग व सरकारकडे तशी विनंती करणार असल्याचे यावेळी सरदेसाई म्हणाले.
आरक्षण करताना घटनात्मक तरतुदी केवळ या पाच पालिका क्षेत्रांत पाळल्या गेल्या नाहीत असे नाही तर इतर पालिकांतही असे प्रकार झाले आहेत. सरकारने सर्वच पालिकांची निवडणूक पुन्हा घ्यायला हवी होती. निदान आता मतमोजणी तरी दुसर्‍या टप्प्यात म्हणजेच एकदमच घ्यावी अशी मागणी आमदार सरदेसाई यांनी यावेळी केली.