देशाची धुरा तरुणांनी खांद्यावर घ्यावी : मोदी

0
13

तरुणांनी देशाची धुरा आता आपल्या खांद्यावर घ्यावी. आव्हानांचा स्वीकार करावा आणि पुढील २५ वर्षांत आपल्याला जसा देश पाहिजे आहे तसा तयार करण्यासाठी का’ सुरू करा, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र ’ोदी यांनी काल कानपूर येथे आयआयटीच्या पदवीधरांना केले. देशघडणीच्या कार्यात आतापर्यंत आपण खूप वेळ वाया घालविला आहे, अशी खंतही ’ोदी यांनी यावेळी व्यक्त केली. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, कानपूरच्या ५४ व्या पदवीदान समारंभात मोदी बोलत होते.

यावेळी बोलताना मोदी म्हणाले की, स्वातंत्र्य प्राप्तीनंतर भारतानेही आपला नवा प्रवास सुरू केला आहे. त्यानंतर २५ वर्षांच्या काळात देश स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी मोठे काम व्हायला पाहिजे होते, पण बराचसा वेळ वाया घालविण्यात आला. देशाचा खूप वेळ वाया गेला. या दरम्यान दोन पिढय गेल्या, पण आता आपल्याला एक क्षणही वाया घालवून चालणार नाही. देशाच्या विकासाची आघाडी आता तरुणांना सांभाळावी असे आवाहन केले.
यावेळी उत्तर प्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते.