..तर कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार केले असते ः शास्त्री

0
121

मी जर भारतीय क्रिकेट निवड समितीचा अध्यक्ष असतो, तर विराट कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार म्हणून निवडले असते, असे भारतीय क्रिकेट संघाचे माजी व्यवस्थापक व क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी म्हटले आहे.

महेंद्रसिंह धोनीने डिसेंबर २०१४ मध्ये कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली, यानंतर कोहलीला कसोटी संघाचा कर्णधार बनविण्यात आले होते. आता एकदिवसीय आणि ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद धोनीकडे आहे, याविषयी अनेकदा रवी शास्त्री हे विराट कोहलीकडे झुकताना दिसत होते.
कोहलीला तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व देण्याबाबत विचारले असता शास्त्री म्हणाले, की मी आता निवड समितीचा अध्यक्ष असतो तर, त्याला कर्णधारपद दिले असते. महेंद्रसिंह धोनीने खेळाचा आनंद घ्यावा, असे शास्त्री म्हणाला.