गारठ्यामुळे १२ जणांचा मृत्यू

0
84

उत्तर भारतात कडाक्याची थंडी आणि दाट धुक्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून आतापर्यंत १२ जणांचा मृत्यू झाला आहे. गारठ्यामुळे उत्तर प्रदेशात ९, तर पंजाबमध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दाट धुक्याचा रेल तसेच विमान सेवेवरही विपरीत परिणाम झाला आहे. १०० पेक्षा अधिक रेलगाड्या उशिरा सोडाव्या लागल्या. जम्मू काश्मीरात तापमान गोठणबिंदूच्या खाली गेले आहे.