खाण कंपन्यांनी दोन महिने संयम पाळावा : भाजप

0
92

राज्यातील भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकार खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्नात आहे. या पार्श्‍वभूमीवर खाण मालकांनी दोन महिने खाण कामगार कपात प्रश्‍नी संयम बाळगावा, अशी मागणी भाजपचे आमदार नीलेश काब्राल यांनी भाजप मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत काल केली.
खाण बंदीच्या प्रश्‍नावर तोडग्याबाबत तीन ज्येष्ठ वकिलांनी सल्ला दिलेला आहे. त्याचा अभ्यास करून सरकारी पातळीवरून योग्य निर्णय घेतला जाणार आहे. ज्येष्ठ वकील हरीष साळवे यांच्याकडे सल्ला मागितला आहे, ते म्हणाले.

चौगुलेच्या कामगारांचे सभापतींना साकडे
पाळी, डिचोली येथील चौगुले कंपनीच्या कामगारांनी काल सभापती तथा साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या व्यथा मांडल्या. कंपनीने कामावर कार्ड पंचिंग करण्यास बंदी आणली असून घरीच बसून पगार दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. मात्र, कामगारांनी कार्ड पंचिंग करण्यास द्यावे अशी आग्रही मागणी कामगारांनी सभापतींसमोर मांडली. याप्रश्‍नी कामगारांचे हित जपण्यासाठी सर्व ते प्रयत्न करू असे आश्वासन सभापती डॉ. सावंत यांनी दिले.