कुंकळ्ळी अपघातात दोघे कामगार ठार

0
100

कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीनजीक काल सकाळी दुचाकीला झालेल्या अपघातात दोघे कामगार ठार झाले. दोघेही आसाम येथील असून, राजकुमार नारद (३५) आणि मंडळ बारह (२७) अशी मृतांची नावे आहेत.

राजकुमार नारद आणि मंडळ बारह हे दोघेही कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीत काम करत होते. सोमवारी सकाळी दुचाकीवरून भरधाव वेगाने कामावर जात असताना त्यांचा वाहनावरील ताबा गेला. यावेळी झालेल्या अपघातात दगडाला डोके आपटल्याने दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तात्काळ मडगाव हॉस्पिसिओ इस्पितळात दाखल करण्यात आले; मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.