किती नोकर्‍या निर्माण केल्या : राणे

0
141

गुंतवणूक धोरण राबवून राज्यात ५० हजार नोकर्‍या निर्माण करण्याची घोषणा करणर्‍या सरकारने आतापर्यंत किती रोजगाराच्या संधी निर्माण केल्या ते आधी सांगावे, असे आव्हान विरोधी नेते प्रतापसिंह राणे यांनी काल विधानसभेत सरकारला दिले. महागाई वाढत असल्याबद्दल त्यांनी सरकारवर टीका केली.
वाढत्या महागाईमुळे श्रमजीवी लोकांना दोन वेळचे अन्न मिळणे कठीण बनले असल्याचे राणे यांनी सांगितले. मजूर मिळत नसल्याने शेतकर्‍यांनी शेती करणे बंद केले आहे, त्यामुळे सरकारने कृषी क्षेत्रात यांत्रिकीकरण करण्याची सूचना विरोधी नेत्यांनी केली.