कॉंग्रेस विधिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारवर जोरदार टीका

0
31

कॉंग्रेस विधिमंडळाच्या काल झालेल्या बैठकीत सत्ताधारी भाजप सरकारवर जोरदार टीका करण्यात आली. राज्यातील प्रशासन पूर्णपणे ठप्प झाले असून कायदा व सुव्यवस्था बिघडली असल्याबद्दल बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत अनेक रुग्णांचा मृत्यू केवळ सरकारच्या गैरव्यवस्थापनामुळे झाल्याबद्दल यावेळी संताप व्यक्त करण्यात आला. रेल्वे दुपदरीकरणास सरकारने जमीन संपादन करण्यास परवानगी दिल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.

राज्यात कोळसा हब निर्माण करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. यावेळी पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी, विकासकामाच्या नावाखाली सरकार केंद्राच्या मदतीने निसर्गावर घाला घालत असल्याचा आरोप केला. तीव्र विरोध असतानाही सरकार हे प्रकल्प पुढे रेटत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.