आरोप सिद्ध झाल्यास होणार मृत्युदंडाची शिक्षा
विद्यार्थी आंदोलनामुळे बांगलादेशमधील शेख हसिनांचे सरकार ऑगस्ट 2024 मध्ये कोसळले व शेख हसिना यांना भारतात आश्रय घ्यावा लागला. यावेळी झालेल्या हिंसाचारात सुमारे 1 हजार 400 लोकांचा मृत्यू झाला होता. शेख हसिना आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. सध्या त्यांच्याविरोधात 152 हून अधिक खटले दाखल झाले असून हे आरोप सिद्ध झाल्यास शेख हसिना यांना मृत्यूदंडाची शिक्षा होऊ शकते.
हसिना यांच्याविरोधात लष्कराच्या पाठिंब्याने स्थापन झालेल्या अंतरिम सरकारकडून खटला चालवला जात आहे. हसिना सध्या भारतात असून बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीत त्यांना मायदेशी परतणे अशक्य आहे. त्यामुळे हा खटला त्यांच्या अनुपस्थितच चालवला जाणार असल्याची शक्यता आहे. 1 जून 2025 पासून शेख हसिना यांच्यावरील खटला ढाक्यातील आंतरराष्ट्रीय गुन्हे न्यायाधिकरणात सुरू झाला आहे.