राज्य सरकारने आश्‍वासनांना हरताळ फासला : कॉंग्रेस

0
119

गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी भाजपने आपल्या जाहीरनाम्यात दिलेल्या आश्‍वासनांच्या बाबतीत पूर्णपणे ‘यु-टर्न’ घेतला असून पर्यटक अमली पदार्थांसाठीच गोव्यात येत असल्याचे सांगून पार्सेकर सरकार आंतरराष्ट्रीय पर्यटकांना कोणता संदेश देतात, असा प्रश्‍न प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी काल पत्रकार परिषदेत केला.राज्यात सध्या लोक असुरक्षित झाले असून कोणत्यावेळी कुणावर हल्ला होईल हे सांगता येत नाही. राज्यपालांनी आपल्या भाषणात २०२१ पर्यंतचा प्रादेशिक आराखडा रद्द करण्याचे आश्‍वासन दिले होते. अद्याप त्यासंबंधी सरकारने काहीही केलेले नाही. कॅसिनो हटविण्याचेही आश्‍वासन दिले होते. आता मुख्यमंत्री पार्सेकर हे काम करीत असल्याचे सांगतात.
केंद्रात व राज्यातही भाजपचे सरकार आहे. त्यामुळे राज्याला विशेष राज्याचा दर्जा मिळेल अशी जनतेची अपेक्षा होती, असे फालेरो म्हणाले.