>> भाजपच्या पराभवाची कारणमीमांसा
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपचा पराभव शैक्षणिक माध्यमप्रश्न, चर्चचा हस्तक्षेप व संघटनेतील हेवेदावे या कारणां-मुळेच झाल्याचे निवडणुकीतील पक्षाच्या पडेल उमेदवारांनी काल भारतीय जनता पक्षाने पराभवाची कारणे समजून घेण्यासाठी पाठविलेल्या बी. एल संतोष यांच्या नेतृत्वाखालील कोर समितीसमोर सांगितले. यावेळी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी आपल्या पराभवाचे कारण मांद्रेतील पक्ष संघटना कमकुवत बनल्यानेच झाल्याचे समितीला सांगितले. अन्य सर्वच पडेल उमेदवारांनी वरील सर्व कारणे दिली आहेत. दरम्यान, पक्षाच्या काही लोकांनी पक्षाच्याच उमेदवाराचा पराभव करण्यासाठी विरोधकांना साथ दिल्याचा आरोपही काही पडेल उमेदवारांनी केल्याचे कळते. या प्रश्नावर भाजपमध्ये सध्या संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे.