निरंकाल येथील माकडमार्या या भटक्या जमातीच्या लोकांच्या झोपड्या उद्ध्वस्त करून त्यांना बेघर करण्याच्या कृत्याची कसून चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याचे निर्देश आपण संबंधित पोलीस निरीक्षकांना दिल्याचे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सांगितले.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामाही केला होता. परंतु बर्याच काळापासून वरील कुटुंबांना तेथून हाकलून लावण्यासाठी काही राजकारणी प्रयत्नशील होते. दक्षिण गोव्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शिंदे यांनी त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला होता.