मनोविकार

0
679

– वैदू भरत नाईक

कारणे ः-
१) अडखळत बोलणे – शारीरिक व्यंग असणे, जीभ आखूड असणे, चुकीच्या जागी टाका असणे, जीभ जड असणे, स्वरयंत्रात अडथळा असणे, कानात दोष असणे, आत्मविश्‍वासाचा अभाव, घरातील मोठ्यांचा अकारण फार मोठा धाक, वरिष्ठांचे दडपण, कृमी, जंत किंवा पोटाच्या तक्रारीने सदैव अस्वस्थता असणे.
२) आत्मविश्वास नसणे – रस व रक्त धातूवर काही कारणाने आघात होणे, दुबळेपणा येणे, कामाचा एकदम भार वाढणे, छातीचा घेर लहान असणे, अपघात याने आकस्मिक खचून जाणे, संतती नसणे, नपुंसकता.
३) न्यूनगंड ः आर्थिक, सामाजिक, कौटुंबिक परिस्थितीमुळे वेळेवर येण्याची संधी न मिळणे, सवंगड्याच्या प्रगतीबरोबर आपली प्रगती होत नसल्यामुळे अधिक खचणे, निद्रानाश, पांडुता, नपुंसकत्व.
४) बुद्धीमांद्य ः अनुवंशिक, लहानपणी तीव्र आजाराने ग्रस्त असणे, कृमी, जंत, मलावरोध किंवा माती खाण्याचे दुष्परिणाम, असमतोल आहार, आसपासची व कौटुंबिक परिस्थिती बुद्धीच्या विकासास पोषण नसणे.

लक्षणे ः-
१. अडखळत बोलणे – एकूण बोलण्यात खूप अडखळत असणे, सुवरवातीला बोलावयास स्टार्ट घ्यावयास वेळ लागणे, एकदा बोलावयास लागल्यावर पुढे अडचण न येणे, नेहमी व्यवस्थित बोलता न येणे पण वरिष्ठांच्या घरातल्यांना एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या दडपणाने अडखळत बोलणे.
२. आत्मविश्वास नसणे – नेहमीचे मर्यादित काम जेमतेम करणे, अधिक काम पडल्यास गडबडून जाणे, संकटकाळात घात, अपघात किंवा थोडेसे नुकसान झाल्याबरोबर अवसान गळणे, कोणत्याही कामात आपणहून पुढाकार न घेणे.
३. न्यूनगंड – शारीरिकदृष्ट्या प्रकृती ठणठणीत असूनही शारीरिक कष्टाचे काम होणार नाही अशी कल्पना करून घेणे, स्वतःमध्ये कमीपणा शोधून त्यामुळे सदैव माघार घेणे, आताच्या धावपळीच्या युगात माणसांचे गर्दीपासून लांब राहणे, थोडक्यात प्रकाश आला असता डोळे मिटणे.
४. बुद्धीमांद्य – वयाच्या, शिक्षणाच्या व अनुभवाच्या मानाने आलेल्या प्रसंगात बुद्धीच्या वापराचा अभाव दिसणे, किमान स्मरणशक्तीच्या अभावाचा नेहमीच अनुभव येणे, खूप वाचून, शिकूनही अनेक वेळा लक्षात न राहणे, स्मरणशक्ती ऐनवेळी दगा देणे.
शरीर परिक्षण –
१) जीभ, घसा, गळा यांचे परिक्षण, बोलण्याचे परिक्षण अडथळ्यासाठी करावे.
२) डोक्याच्या मागच्या भागात पुरेशी वाढ आहे का असे परिक्षण न्यूनगंडासाठी करावे.

पथ्यापथ्य –
अ) अडखळत बोलणे – थंड, तेलकट, डालडा असे पदार्थ कटाक्षाने टाळावेत. जेवणात तुळस, पुदिना, आले, लसूण यांचाच वापर करावा. शक्य असल्यास रोज एक बदाम खावा.
ब) आत्मविश्‍वास नसणे – तिखट, आंबट, खारट हे पदार्थ टाळावेत. गरम पेय घ्यावे. जेवणात उडीद, मूग, गहू, तूप, साखर यांचे प्रमाण अधिक असावे. गरम पेय घ्यावे. जेवणात उडीद, मूग, गहू, तूप, साखर यांचे प्रमाण अधिक असावे.
क) न्यूनगंड – स्वतःला प्रिय वाटेल, आवडेल अशा वातावरणातची निवड करून जेवणखाण करावे.
ड) बुद्धीमांद्य – तेलकट, तुपकट, डालडा खूप थंड पदार्थ कटाक्षाने टाळावेत. रात्री लवकर जेवावे. एकूण जेवणावर ताबा असावा.
– व्यायाम, दीर्घश्‍वसन, पिंपळ प्रदक्षिणा, आनंदाने राहणे सर्वांच्या हिताचे आहे.